२८ डिसेंबरच्या महारॅलीसाठी हजारोंच्या संखेने सहभागी व्हा. अ. भा. काँग्रेस चे सचिव माजी मंत्री धिरज गुर्जर है तैयार हम महारॅलीस जिल्ह्यातून हजारोंच्या संखेने सहभागी होणार. जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे. २८ डिसेंबर च्या है तैयार हम रॅली संदर्भात नियोजन बैठक संपन्न.

Khozmaster
4 Min Read
(प्रतिनिधी ) चिखली २५ डिसेंबर २०२३,
आज देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम केले जात आहे, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अत्याचारी व्यवस्था निर्माण केली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. भाजपा सरकारने निर्माण केलेल्या या अत्याचारी व्यवस्थेला संपवण्यासाठी, भ्रष्टाचारमुक्त भारत, अत्याचारमुक्त भारत निर्माण करण्याबरोबरच रोजगार निर्मिती करणे, महागाई कमी करणे, शेतकरी, कामगार यांना न्याय देणे, लोकशाही व संविधान वाचवणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे आणि त्यासाठीच ‘है तैयार हम’ अशी संकल्पना मांडलेली आहे. नागपूरमध्ये होत असलेल्या या मेळाव्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा. असे आवाहन अ.भा.काँग्रेस चे सचिव माजी मंत्री धिरज गुर्जर यांनी केले.
आज स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली येथे २८ डिसेंबर च्या है तैयार हम रॅली साठी नियोजन बैठक अ.भा. काँग्रेस चे सचिव माजी मंत्री धिरज गुर्जर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखालील बैठक घेण्यात आली, यावेळेस प्रमुख उपस्थितीत मा.आ. हर्षवर्धन सपकाळ, मा.आ. राजेश एकडे, मा. आ. दिलीपकुमार सानंदा, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, सरटिणीस श्यामभाऊ उमाळकर, प्रदेश सचिव चंद्रकांत वानखेडे, प्रदेश सचिव रवी पाटील, प्रदेश सचिव अॅड जयश्रीताई शेळके, जेष्ठ काँग्रेस नेते लक्ष्मणराव घुमरे, मनोज कायंदे, अॅड अनंतराव वानखेडे, प्रदेश कार्याध्यक्ष सेवादल तेजेंद्रसींह चव्हाण, जिल्हा सरचिटणीस सुनिल सपकाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय जनता पक्ष लोकशाही मानत नाही म्हणूनच संसदेचे कामकाजही हुकूमशाही पद्धतीने चालवले जाते. संसदेत दोन लोकांनी घुसून गोंधळ घातला यावरून संसद सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असल्याने विरोधी पक्षांच्या खासदारांनी चर्चा करण्याची मागणी लावून धरली आहे पण मोदी सरकार चर्चा करण्यास तयार नाही. सरकारला संसद सुरक्षेवर प्रश्न विचारल्याने विरोधी पक्षांच्या १४२ खासदारांना हुकूमशाही पद्धतीने निलंबित केले आहे, असेही गुर्जर म्हणाले.
बैठकीच्या सुरुवातीस विरपुत्र सुभेदार अनंताभाउ गिते यांना कर्तव्यावर असताना हरियाणा येथे वीरमरण आले त्यांना सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळेस उपस्थितीतांनी आपापल्या ब्लाॅक चा आढावा दिला व पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सुचना मार्गदर्शन केले.
यावेळेस अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले की , स्वातंत्र्य चळवळीत डिसेंबर १९२० मध्ये नागपूरच्या भूमितूनच महात्मा गांधी यांनी जुलमी, अत्याचारी ब्रिटिश सत्तेविरोधात असहकार आंदोलनाचा नारा दिला होता. शेवटी १९४७ मध्ये ब्रिटिशांना भारत देश सोडून पळून जावे लागले हा इतिहास आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूरमधूनच १९५९ मध्ये इंदिराजी गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नागपूर शहरात काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस साजरा होत आहे ही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी महत्वाची व आनंदाची बाब आहे.ज्या मैदानात हा मेळावा होत आहे त्याला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव दिले असून ‘है तैयार हम’ अशी या महारॅलीची संकल्पना आहे या ऐतिहासिक रॅली ला जास्तीत जास्त संखेने सहभागी व्हा असे आवाहन केले.
या बैठकीसडाॅ. अरविंद कोलते, भगवान धांडे, सुभाष पेसोडे, अॅड हरिष रावळ, प्रकाश पाटील अवचार, सय्यद इरफान, नंदुभाऊ शिंदे, चित्रांगण खंडारे, अनिकेत मापारी, दिपक देशमाने, समाधान सुपेकर, साहेबराव पाटोळे, गजानन खरात, सरस्वतीताई खाचने, शैलेश खेडकर, राम डहाके, देवानंद पवार, विष्णू झोरे, अॅड जावेद कुरेशी, विजय पाटील शेजोळ, अविनाश उमरकर, शेख समद, भुषण मापारी, राजेश पोलाखरे, निलेश पाउलझगरे, तुळशीराम नाईक, गणेशराव पाटील, गजानन मामलकर, शिवदास रिंढे, बंडू चौधरी, राजू पाटील, दत्ता काकस, संताराम तायडे, सुनिल तायडे,  रामभाऊ जाधव, गजानन लांडे, अंबादास बाठे, डाॅ. सतेंद्र भुसारी, ज्ञानेश्वर सुरोशे, मोहनसेठ जाधव, डाॅ. इसरार जमादार, नासेर सौदागर, संजय सुळकर, प्रशांत देशमुख, स्वप्नील देशमुख, डाॅ अमोल लहाने, सुनिल सुरडकर,  निलेश अंजनकर, अथहर काझी, राजू रज्जाक, कलिम खान, डाॅ. संजय घुगे, बंडू कुलकर्णी , रवी पाटील, शिवराज पाटील, रामधन पाटील, पुरूषोत्तम हाडे, प्रकाश चव्हाण, रामेश्वर भुसारी, रिक्की काकडे, पुरूषोत्तम झाल्टे, प्रदिप पचेरवाल, जाकीर भाई, विजय गिते, खलील बागवान,प्रमोद टेकाडे, स्वप्निल सुरडकर, कैलास खराडे, आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस सुनिल सपकाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदुभाऊ शिंदे यांनी केले.

0 9 4 6 9 6
Users Today : 46
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *